*अद्रक शेती*
*विषय* अद्रक कंदकुज कारणे व उपाय.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
या भागात आपण कंदकुज होण्याचे कारणे समजून घेणार आहोत. कंदकुज होण्याचे मुख्य कारण आहे हानिकारक बुरशी ही बुरशी कधी तयार होते, ज्यावेळेस जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही त्यावेळेस. जमिनीचे आरोग्य चांगले असणे म्हणजे जमीन सजीव असणे. जमीन सजीव करण्यासाठी आपल्याला उपयुक्त जिवाणूंचे कल्चर जमिनीला पाजावे लागते. आता अनेक कंपन्यांनी जमिनीचे कल्चर तयार केलेले आहे.त्याच्याने जमीन भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीत हानिकारक बुरशी तयार होत नाही. दुसरे कारण म्हणजे जमिनीत पाणी साचने,जमिनीत पाणी साचल्याने उपयुक्त जिवाणूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हानीकारक बुरशींची उत्पत्ती होण्यास सुरुवात होते.त्यामुळे बेडच्या खालच्या भागात किंवा प्लॉटमध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हा प्रकार उद्भवू नये म्हणून लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक एकरी एक एक लिटर किंवा एक एक किलो सोडावे ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असून ती हनिकरक बुरशीला खाते. काही शेतकरी कंदकुज लागू नये म्हणून रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक सोडतात आणि त्याने नेमके उलट होते. रासायनिक बुरशीनाशक सोडल्यास उपयुक्त जिवाणू मरतात आणि हानिकारक बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते. आपण आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड टाकल्यासारखे घडते.म्हणजे आपण रासायनिक बुरशीनाशके किंवा कीटक नाशक दिल्याने हानिकारक बुरशिला आमंत्रण देतो.त्यामुळे ट्रायकोडर्मा व सुडोमोनास द्यावे आणि हुमणी साठी मेटारायझीयम हे जैविक जिवाणू द्यावे हे तीनही जैविक आहे व विद्यापीठात अत्यल्प दरात मिळतात काही कारणास्तव कंडकुज आल्यास रासायनिक बुरशीनाशके दिल्यास हरकत नाही परंतु येण्याअगोदर कुठलेही रासायनिक बुरशीनाशके वापरू नये त्यांनी कंदकुज येण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत वाढते म्हणून कधीही जैविक बुरशीनाशकाचा वापर योग्य ठरतो.
धन्यवाद,
कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे *गुलाबी बोंडअळीचे पतंग अंडि जास्त घालत असल्याने, फक्त गुलाबी बोंड अळी मारूनच चालणार नाही, तर त्या गुलाबी बोंडअळीची अंडी पूर्णतः नष्ट केली, तरच बोंडअळी पासून सुटका होऊ शकते. त्यासाठी लार्विनची फवारणी करावी.* * लार्विन हे अळी, अंडी आणि पतंग यांना मारते.* *🎯 लार्विन 30 ग्राम प्रती पंप - फूल अवस्था आणि पाती अवस्था मध्ये फवारणी करावी , कारण बोंडअळी ही फूल आणि पाती मध्येच येते*। ✅ *जीवनचक्र:-* गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकावरील एक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षांमध्ये या किडने जणूकाही थैमानच घातला आहे. असा शेतकरी नाही, की ज्यांना बोंडअळी माहित नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी ही ही उशिरा येणारी किडि म्हणजे लागवडीपासून 90 दिवसांत येणारे कीड आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून ही कीड ६० दिवसांतच आढळून आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नांदेड,वर्धा, यवतमाळ, बीड जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा