⛳ जमिनीलाही मिळणार आधार नंबर !- पहा कसा आहे केंद्र्सरकारचा निर्णय
🎯 स्क्रोलअप - महत्वाची माहिती 🪐
💰 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडताना , जमिनींच्या डिजिटल नोंदणीची घोषणा केली - तर 2023 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवलं
✍️ या डिजिटल नोंदणीनंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन - तुम्हाला फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे मिळतील
💁♂️ पहा डिजिटल लँड रेकॉर्डविषयी ?
🔰 तसे पाहिले तर भारतात 140 दशलक्ष हेक्टर जमिनीवर शेती होते - दरम्यान डिजिटल लँड रेकॉर्ड मध्ये नोंदणी झाल्यानंतर आपल्या जमिनीसाठी 14-अंकी ULPIN क्रमांक मिळेल
🔰 सोप्या भाषेत हा जमिनीचा आधार क्रमांक असेल - या ULPIN क्रमांकाद्वारे जमीन खरेदी-विक्री खूप सोपी होणार
🔰 तसेच डिजिटल रेकॉर्डमुळे जमिनीची खरी स्थिती सुद्धा कळणार - यामध्ये जमिनीचे विभाजन झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक हा वेगळा असेल
🔰 जमिनीचे मोजमाप हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होईल - देशामध्ये याची सुरवात सर्वप्रथम नऊ राज्यांमध्ये सुरवात होईल
🔰 यामध्ये महाराष्ट्र, गोवा, बिहार, ओडिशा, सिक्कीम, गुजरात, त्रिपुरा, राजस्थान आणि हरियाणा - या राज्याचा समावेश आहे
🔰 डीजीटल क्रमांक वापरल्याने बेनामी मालमत्ता - म्हणजे जिथे मालमत्ता खरेदीदार/विक्रेत्याचे नाव खरे नाही ते रोखण्यास मदत होईल
📣 *जमिनीलाही आधार नंबर मिळणार* -
उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा