मुख्य सामग्रीवर वगळा

कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे

 कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळीचे संपुर्ण  नियंत्रणासाठी काय केले पाहिजे आणि फवारणी केव्हा केली पाहिजे


*गुलाबी बोंडअळीचे पतंग अंडि जास्त घालत असल्याने, फक्त गुलाबी बोंड अळी मारूनच चालणार नाही, तर त्या गुलाबी बोंडअळीची अंडी पूर्णतः नष्ट केली, तरच बोंडअळी पासून सुटका होऊ शकते. त्यासाठी लार्विनची फवारणी करावी.* 

*लार्विन हे अळी, अंडी आणि पतंग यांना मारते.*

*🎯 लार्विन 30 ग्राम प्रती पंप - फूल अवस्था आणि पाती अवस्था मध्ये फवारणी करावी , कारण बोंडअळी ही फूल आणि पाती मध्येच येते*।


✅ *जीवनचक्र:-*

गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकावरील एक प्रमुख कीड आहे. मागील काही वर्षांमध्ये या किडने जणूकाही थैमानच घातला आहे. असा शेतकरी नाही, की ज्यांना बोंडअळी माहित नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी ही ही उशिरा येणारी किडि म्हणजे लागवडीपासून 90 दिवसांत येणारे कीड आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून ही कीड ६०  दिवसांतच आढळून आली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नांदेड,वर्धा, यवतमाळ, बीड जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. जवळपास 20 ते 30 टक्क्या पर्यंत उत्पादनामध्ये या किडीमुळे घट झाल्याचे दिसून आले आहे.

🎯गुलाबी बोंड आळीची अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात.

🎯गुलाबी बोंड अळीची अंडी कपाशीच्या फुले,बोंडे, देठ व कोवळ्या पानाच्या खाली असतात. 

🎯अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्व झालेल्या अड्यांतून अळी बाहेर पड़ते.

🎯अंड्यातून निघालेली बोंड अळी ही रंगाने पांढुरकी असते, परंतु पूर्ण वाढ झाल्या नंतर ति गुलाबी रंगाची दिसते. 

🎯 अळी 21 दिवसापर्यंत कपाशीवर राहते.

🎯अळी फुले व हिरव्या रंगाच्या बोंडाना नुकसान पोहोचवते. ज्या फुलांमध्ये अळी असते, अशी फुले अर्धवट उघडलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, त्याला डोमकळी म्हणतात. 

🎯 बोंड आळी ही सुरुवातीला फुलं आणि पात्या मध्ये येते. आनी फुलं पात्याच नुकसान करते.

🎯अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तीच्या विष्ठेने बोंडाचे छिद्र बंद करते, त्यामुळे बोंडाचे दुरुन निरीक्षण केल्याने अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.

🎯किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक न होताच फुटतात.

🎯शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीचेही नुकसान करते. व कापसाची प्रत बिघडते


21 दिवसानंतर  गुलाबी बोंड अळी  ही  स्वता भोवती कोष निर्माण करुण कोषावस्थेत जाते. कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते, तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात. पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात.  या किडीची अळी आणि कोश या वस्तीमध्ये सुप्तावस्था दिसून येते. तिची सुप्त अवस्था ही जवळपास दोन वर्षे राहते. किडीचा पतंग सात ते दहा दिवस जगतो आणि तीन ते पाच दिवसात दीडशे ते दोनशे अंडी घालते. ही कीड आपला जीवनक्रम सहा ते आठ आठवड्यामध्ये पूर्ण करते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad

  उन्हाळी सोयाबीन लागवड | सोयाबीन लागवड | unali soyabin lagwad उन्हाळी सोयाबीन चे घ्या १५ क्विंटल पर्यंत उत्पादन- महाराष्ट्र खरिप हंगामामध्ये सोयाबीन जवळजवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले. गेल्या हंगामामध्ये पिकाच्या फुलोरा काळात आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे प्रति एकर उत्पादन हे ६-८ क्विंटल प्रति एकर इतकेच निघाले. या गोष्टींमुळे पुढील खरीप हंगामामध्ये बियाणे टंचाईचा फटका बसू शकतो. हा प्रश्न मिटण्यासाठी शेतकरी तर पेरणी करतातच परंतु सध्या कृषी विभागसुद्धा उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी पुढाकार घेत आहे. उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेताना काही महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिल्यास आपल्याला बीजोत्पादन क्षेत्राचे उत्पादन १०-१५ क्विंटल प्रति एकर मिळू शकते. सोयाबीन साठी जमीन व हवामान - जमिनीचा सामू हा ६.५ - ७.५ व जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. तापमान १८ ते ३५ अंश सेल्सियस मध्ये पिकाची वाढ चांगली होते. परंतु फुलोऱ्या दरम्यान तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पादन घटते. सोयाबीन ल...

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स  राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम शेतकरी बंधूंनो कपाशीवरील गुलाबी बोंड अळी अलीकडील काही काळात शेतकऱ्यासाठी कपाशीवरील एक महत्त्वाची नुकसानदायक कीड म्हणून समोर आली आहे. परंतु या किडीच्या प्रतिबंधासाठी व व्यवस्थापनासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन सूत्रांचा वापर केल्यास या या किडीचे प्रभावी व्यवस्थापन मिळण्यास मदत होते. (१) शेतकरी बंधुंनो कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रतिबंध करण्याकरता कोणत्याही परिस्थितीत फरदड कापूस घेणे टाळावे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात मागील कपाशीचे पीक संपूर्ण कापूस वेचणी करून कपाशी मुक्त झालेले असेल याची दक्षता घ्यावी . फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळी ला सतत खाद्य उपलब्ध होते त्यामुळे फरदड घेणे टाळावे. असे केल्याने गुलाबी बोंड अळी ला खाद्य प्राप्त न झाल्यामुळे जीवनचक्रात बाधा निर्माण होते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्यामुळे  कपाशी...

जीवमृत काय आहे? जीवमृत कसे तयार करावे

जीवामृत शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जीवामृत चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. हरित क्रांतीनंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर डोळे लावून केला जात आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही नष्ट होत चाललेली आहे. व भारतातील जवळपास सर्व जमीन नापीक होण्याच्या मार्गावर सध्या आपण सर्वच चाललेलो आहोत. शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपये रासायनिक खतांमध्ये खर्च होत चालले आहे व त्याचं बरोबर उत्पादना मध्ये सुद्धा घट होत चालली आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी त्यामुळेेे शेतकऱ्याच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आपल्या आहारात  ह्या  विषाच्या वापरामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. या सर्व समस्यांचं समाधान यावर उपाय म्हणून जैविक शेती ला प्राधान्य मिळत चालले आहे. जैविक शेती साठी लागणारी सामग्री शेतकऱ्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे त्यामुळे जैविक शेतीसाठी खर्च येण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे रासायनिक खताचा अतिरिक्त वापर न करता जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंपोस्टखत, वर्मीकंपोस्ट, जीवामृत, गोमूत्र, याचा वापर करणे गर...